अॅडलेड, : पहिल्या दिवशी भारताच्या चेतेश्वर पुजाराची विकेट सर्वात महत्वाची होती. कारण पुजारा आणि कर्णधार कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली होती. पण पुजारा या डावात आऊट होता की नाही, याबाबत चांगलेच नाट्य घडलेले पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने यावेळी एक चांगला चेंडू टाकला आणि पुजाराने त्यावर फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जोरदार अपील केली. पण पंचाचा निर्णय न पाहताच पुजारा हा पेव्हेलियनच्या दिशेना जायला निघाला. पण जेव्हा मैदानावरील पंचांनी आपल्याला नाबाद ठरवले हे त्याने पाहिले तेव्हा तो थांबला आणि पुन्हा एकदा क्रीझमध्ये आला.

पुजाराला पंचांनी नाबद दिल्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये चर्चा सुरु झाली आणि त्यांनी लगेच डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी चेंडू नेमका कुठे लागला आणि झेल व्यवस्थित पकडला आहे की नाही, याची चाचपणी केली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी पुजारा बाद असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुजारा पेव्हेलियनच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना झाला.

या सर्व नाट्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामध्ये क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, त्यामुळे पुजाराने जे केले ते योग्य होते, असे काही जण म्हणत होते. पण काही जणांनी, जोपर्यंत पंच बाद असल्याचा निर्णय देत नाही, तोपर्यंत क्रीझ सोडू नये, असे आपले मत मांडले. या घटनेचे पडसाद दिवसभर सोशल मीडियावर उमटत होते.

पहिल्या दिवसाचा टर्निंग पॉइंट काय ठरला…पुजाराने यावेळी सांगितले की, ” आजच्या तिसऱ्या सत्रात भारतीय संघ जलदगतीने धावा जमवत होता. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दमदार फलंदाजी करत होते आणि ऑस्ट्रेलियाचा संघ त्यावेळी पिछाडीवर होता. पण कोहली आणि रहाणे यांच्या विकेट्स या ठराविक अंतराने गेल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला फायदा झाला. पण सध्याच्या घडीलाहा भारतीय संघ सुस्थितीत आहे.”

भारतीय संघाने किती धावा करायल्या हव्यात…पहिल्या डावात भारतीय संघाने किती धावा करायला हव्यात, याबाबत पुजारा म्हणाला की, ” दुसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाज चांगल्या धावा करतील, यावर मला विश्वास आहे. माझ्यामते भारतीय संघाला २७५-३५० धावांपर्यंत मजल मारायला हवी. कारण या खेळपट्टीवर जर ऑस्ट्रेलियावर दबाव बनवायचा असेल तर भारताला एवढी धावसंख्या करायला हवी. माझ्यामते वृद्धिमान साहा आणि आर. अशिवन हे चांगली फलंदाजी करतील आणि भारतीय संघ ही सन्मानजनक धावसंख्या उभारू शकेल.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here