मुंबईः मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून मुंबईकरांचं नुकसान करत आहात, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रवक्ते यांनी केली आहे.

मेट्रो कारशेड वादाप्रकरणी विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी मी अहंकारी आहे माझ्या महाराष्ट्र व मुंबईकरांच्या हितासाठी, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे कृती व उक्ती यांच्यातील अतंराच उत्तम उदाहरण होते. वर्षभर सरकार विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला व समर्थनार्थ जी उदाहरण दिली ती सर्व कामं मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरु झाली होती, असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.

‘मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे, त्यामुळे अन्य ठिकाणी लक्ष वेधण्यापेक्षा सरकारने नेमलेल्या सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते, असं सांगतानाच उपाध्ये यांनी अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबई बद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून मुंबईकरांच नुकसान करीत आहात,’ असा टोलाही लगावला आहे.

‘ज्या कांजूरमार्गचे समर्थन करत आहात तिथल्या कारशेड अडचणी आपण नेमलेल्या सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूर कारशेडचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे आहे? याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही. मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता इतरत काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ट्ये आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here