घडले असे की, भाजी मंडईत नेहमी टोमॅटो विकणारा विक्रेता रविवारी कांदा विक्री करू लागला. हा अचानक कांदा विकून आमच्याशी स्पर्धा करतो, असे म्हणत एका कांदा विक्रेत्यांनी कांद्याचे दर पाडले. ईर्षेपोटी ४० रुपये किलोचा कांदा दोन रुपये किलोने विक्री करण्यास सुरुवात केली. ४० रुपयांचा कांदा अवघ्या दोन रुपये किलोने मिळत असल्याने ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाली.
ग्राहकांची गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली. इर्षेपोटी नुकसान झाल्याचे लक्षात येताच व्यापा-यांचे दोन गट आमने सामने आले. त्यांच्यात वादावादी आणि राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटातील वाद थांबवला. कांदा आणि टोमॅटोचे दर व्यापाऱ्यांच्या आपसातील इर्षेमुळे कमी करण्यात आले असले, तरी करोनाच्या काळामध्ये ग्राहकांना कमी दरात कांदा आणि टोमॅटो मिळाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times