नगर: नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ यादरम्यान झाला आहे. याप्रकरणी आज बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ( Latest News )

वाचा:

घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. बँकेत कोट्यवधीचा अपहार झाला असून त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातत्याने बँकेच्या काही सभासदांकडून करण्यात येत होती. त्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांकडे हे सभासद पाठपुरावा करीत होते. त्यातच आज बँकेचे सभासद यांच्यासह पोपट लोढा, बहिरनाथ वाकळे, मनोज गुंदेचा, अनिल गटणी, रवींद्र सुराणा, ऋषिकेश आगरकर आदींनी बँकेचे प्रशासक यांच्या दालनामध्ये आंदोलन केले. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही दालनातून उठणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. त्यानंतर बँकेचे प्रशासक एस. सी. मिश्रा यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देऊन त्यासाठी बँकेचे शाखा अधिकारी मारुती औटी यांना प्राधिकृत केले. त्यानंतर औटी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.

वाचा:

फिर्यादीत म्हटले आहे की, बँकचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी ( रा. देवेंद्र बंगला, आनंद ऋषी मार्ग , अहमदनगर ), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ ( रा. अर्बन बँक कॉलनी , शिलाविहार समोर , गणेश मंदीर शेजारी , सावेडी ), कर्जदार मे. टेरासॉफट टेक्नॉलॉजीचे प्रोप्रायटर आशुतोष सतिष लांडगे ( रा.शिवानंद , वेदांतनगर , सावेडी रोड , अहमदनगर) यांनी कट रचून, संगनमत करुन, खोटी कागदपत्रे तयार करून, बँकेच्या तब्बल तीन कोटी रुपये रकमेचा अपहार करून ठेवीदार , सभासद यांचा विश्वासघात केलेला आहे. ही रक्कम आर. बी. कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराज एटरप्राइजेस संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करून, त्यांच्या खात्याद्वारे काढून घेतली आहे. आरोपींनी अपहार केलेली रक्कम तब्बल तीन कोटी एवढी आहे. आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव व १३ खोटी कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहेत. या कर्ज प्रकरणाच्या आधारेच आरोपींनी बँकेच्या रकमेची चोरी, अफरातफर व फसवणूक केलेली आहे. या फिर्यादीवरून माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह घनशाम अच्युत बल्लाळ व आशुतोष सतिष लांडगे तसेच तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वाचा:

दरम्यान, आरोपींमध्ये समावेश असणारे दिलीप गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मतदारसंघातून ते तीन वेळा निवडणूक जिंकले होते. पंधरा वर्षे त्यांनी खासदार म्हणून काम केले असून त्यांनी काही काळ केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली होती. गांधी यांच्यावर बँकेतील रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here