भारताच्या आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत (शुक्रवारी सकाळी ८.०० ते शनिवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) भारतात २३ हजार ०६७ रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी ०१ लाख ४६ हजार ८४५ वर पोहचलीय.
: ९५.७७ टक्के : २.७५ टक्के : १.४५ टक्के
गेल्या २४ तासांत ३३६ जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या १ लाख ४७ हजार ०९२ वर पोहचलीय.
आत्तापर्यंत देशात एकूण ९७ लाख १७ हजार ८३४ रुग्णांनी करोनावर मात केलीय. गेल्या २४ तासांत २४ हजार ६६१ रुग्ण या आजारातून बरे झालेत. सोबतच, देशाचा रिकव्हरी रेट ९५.७७ टक्क्यांवर पोहचलाय.
देशात सध्या २ लाख ८१ हजार ९१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times