१.विषाणूचा प्रसार होत असल्याने राज्य सरकारांनी मुक्त संचारावर लावलेल्या निर्बंधांमुळे सर्वात मोठा परिणाम सेवा क्षेत्रावर झाला. लोकांना कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वाहनांमुळे जाता येत नसल्याने बेरोजगारीत वृद्धी झाली. यातच भारतातील बहुसंख्य रोजगार असंघटित क्षेत्रातील असल्याने, कामाच्या अभावाने लाखो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतावे लागले. पर्यटन, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरही नकारात्मक परिणाम झाला. चांगली बाब म्हणजे, तद्नंतर आलेल्या अनलॉकमध्ये ही स्थिती बदलली असून या क्षेत्रांत पुन्हा एकदा मागणीत चांगलीच वाढ होत आहेत, असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट ज्योती रॉय यांनी व्यक्त केले. दिवाळीच्या हंगामात, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) १०.८% मागणीत वृद्धी झाली, त्यामुळे बाजाराला मिळालेली ही गती कायम राहिल असा अंदाज वर्तवला गेला.
२. कोरोनामुळे झालेला आणखी एक बदल म्हणजे अनेक कंपन्यांना त्यांच्या कामकाजात मोठा बदल करावा लागला. कोरोनाच्या उद्रेकामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाने ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’चा प्रसार झाला. लोकांना प्रत्यक्ष येऊन कामाची नोंदणी करावी लागत असल्याने कोव्हिड-१९ पूर्वी ही गोष्ट विचाराधीनच नव्हती. ही स्थिती संस्था आणि कर्मचा-यांसाठीही फायद्याची ठरली. कारण कंपन्यांचा खर्चही कमी झाला आणि कर्मचा-यांचा प्रवासातील वेळ वाचला. कर्मचारी बहुतांश वेळ घरीच रहात असल्याने संबंधित खर्च कमी झाला. तर दुसरीकडे कंपन्यांना रिअल इस्टेट किंवा इतर सेवांसाठीचा खर्च कमी करता आला. कंपन्या आता सक्रियपणे टीअर ३ आणि ४ शहरांमधील कर्मचा-यांचीही भरती करणार आहेत, कारण त्यांना स्थलांतर करण्याची गरज नाही.
३. आरोग्य क्षेत्रातील स्थितीही अशीच आहे. कंपन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्यो आरोग्य व फार्मा क्षेत्रातील शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. सध्याच्या स्थितीमुळे ग्राहक मोबाइल अॅपच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याने फार्मा आणि हेल्थ टेक कंपन्याही डिजिटल क्षेत्रातील संधी पडताळून पाहत आहेत. विषाणूच्या प्रसारापूर्वीही या क्षेत्रात संबंधित दिशेने प्रगती सुरू होती. कोव्हिड-१९ मुळे ही वृद्धी वेगाने झाली. या घटनांचा परिणाम म्हणून, इतर स्टेकहोल्डर्सपैकी हेल्थ व वेलबिइंग क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित झाल्याचे दिसून येते.
४. कोव्हिड-१९ चा उद्रेक झाल्याने, सरकारे आणि मध्यवर्ती बँकांनी जागतिक मंदीच्या काळापेक्षाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहनपर आर्थिक पॅकेज जाहीर केले. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये तर जवळपास शून्य व्याजदर करण्यात आले. त्यामुळे जागतिक तरलतेत वाढ झाली व भारतासह नवोदित बाजारपेठेत एफआयआयचा प्रवाह वाढला. भारतात २०२१ या वित्तवर्षासाठी २ लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक झाली. बेंचमार्क निर्देशांक सर्वोच्च स्थानावर व्यापार करताना दिसत असल्यामुळे स्टॉक मार्केटमध्येही मजबूत बूलरन दिसली. बाजारात प्रवेश करण्याकरिता खूप कमी मूल्य प्रदान करावे लागत असल्यामुळे गुंतवणुकदारांनी या संधीचा लाभ घेतला. परिणामी बाजारात रिटेल भागीदारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले.
५. अखेरीस, या साथीने आपल्याला आर्थिक शहाणपणाचे धडे शिकवले. तुम्ही नियमित गुंतवणूक आणि लिक्विट फंडांद्वारे आर्थिक नियोजन केल्यास, अशा प्रकारच्या संकटात तुम्हाला नक्कीच मदत होते. कठीण परिस्थितीवर आपण कशी मात करायची हे यातून शिकता येते, पण त्यासोबतच, बाजारातील संधी कशी साधायची हेसुद्धा कळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत असून महागाईवर याद्वारे मात करता येते. आपल्या उत्पन्नाच्या प्राथमिक स्रोतापासून ते दुय्यम स्रोतापर्यंत नेहमीच एक आपत्कालीन योजना असावी लागते. तसेच, लॉकडाऊनदरम्यान, तरलतेच्या अभावामुळे कुटुंबांना प्रचंड त्रास झाला. अशा स्थितीत संकट काळावर मात करण्यासाठी तरलतेची गरज असते आणि ती केवळ पर्यायी उत्पन्नाच्या स्रोताद्वारेच मिळवता येते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times