पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्याचा खेळ २३ षटकांवर आणण्यात आला. डकवर्थ लुइस नियमाप्रमाणे न्यूझीलंडला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान देण्यात आले. भारतीय संघाकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीरांनी संयमी फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी रचली. ऑली व्हाईटला बाद करत रवी बिश्नोईने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. न्यूझीलंडचा दुसरा सलामीवीर ऱ्ह्यास मारीयू याने ४२ धावा काढत संघाचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथर्व अंकोलेकरने त्याला माघारी धाडले. फर्ग्युस लेमन (३१) याचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा कोणताही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही. नियमित अंतराने न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत राहिले आणि २१ षटकांत न्यूझीलंडचा डाव १४७ धावांवर आटोपला. भारताकडून याने ४ गडी टिपले. त्याला याने ३, सुशांत मिश्रा आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी एक बळी घेत योग्य साथ दिली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडच्या संघाने घेतला. भारताचे सलामीवीर आणि यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. काही वेळानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली. बराच काळ पाऊस पडल्याने सामन्यातील मोठा वेळ वाया गेला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी खेळपट्टीची पाहणी करत हा सामना २३ षटकांचा केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने नाबाद ५७ धावा तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५२ धावांची खेळी केली. पावसाचा व्यत्यय आला, त्यावेळी भारताची धावसंख्या बिनबाद ११५ होती. सामन्यातील मोठा वेळ वाया गेल्याने डकवर्थ लुइस नियमाप्रमाणे न्यूझीलंड संघाला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान देण्यात आले. या विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली असून, अ गटातील गुणतालिकेत ६ गुणांसह भारत पहिल्या स्थानावर आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times