म.टा. प्रतिनिधी, मुंबई

‘एअरबस ३२० निओ’ जातीच्या विमानातील इंजिनात त्रुटी असल्याने डीजीसीएने या विमानांच्या उड्डाणांवर मर्यादा आणली आहे. परिणामी गो एअरची मुंबईहून उडणारी ४५ उड्डाणे येत्या काळात रद्द होण्याची शक्यता आहे.

गो एअरच्या ताफ्यात १३ ‘एअरबस ३२० निओ’ विमाने आहेत. या विमानांच्या प्रॅट अॅण्ड व्हिटने कंपनीच्या इंजिनात सातत्याने बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत किमान एक इंजिन बदलण्याची सूचना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने () दिली होती. परंतु एअरबस कंपनी व प्रॅट अॅण्ड व्हिटनेकडून यात विलंब होणार आहे. यामुळे गो एअरने काही विमानांचे उड्डाण बंद करण्याचा निर्णय घेतला. परिणामी ९ मार्चपर्यंत कंपनी फक्त निवडक मार्गांवरील उड्डाणेच सुरू ठेवणार आहे. त्यातून मुंबईहून उडणारी ४० ते ४५ विमाने येत्या काळात ऐनवेळीदेखील रद्द होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी विमान वेळा तपासून घ्याव्यात, असे आवाहन कंपनीने केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here