वाचा:
रामदास आठवले हे नगरमध्ये सोमवारी रात्री काही काळ सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच जाणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘शरद पवार यांचे नाव यूपीएच्या अध्यक्ष पदावर यावे, असे शिवसेनेचे मत असले तरी कॉंग्रेस पक्ष ते अजिबात मान्य करणार नाही. कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. यांच्याबाबत मला आदर आहे. ते सक्षम असे नेते आहेत. पण पवार यांना यूपीए अध्यक्षपद मिळणे अशक्य आहे. कारण सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष पद देण्याची यांची मागणी योग्य नाही. या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणीमुळे सरकारमध्ये मतभेद होतील, व हे सरकार पडू शकते,’ असा दावाही आठवले यांनी केला.
वाचा:
‘काँग्रेसमध्ये स्वाभिमान असेल तर ते त्यांचा वेळोवेळी अपमान होत असताना, त्यांना कमी लेखले जात असताना ते महाविकास आघाडीत का राहिले आहेत?’, असा प्रश्न उपस्थित करताना आठवले यांनी काँग्रेसला सरकारचा पाठिंबा काढण्याचा सल्लाही दिला आहे. काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर सरकार पडेल. हे सरकार पडल्यावर आम्हाला सरकार बनवण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कोणता पक्ष व आमदार आमच्याकडे येऊ शकतात, ते आम्ही पाहू व बहुमत सिद्ध करून दाखवू, असे आठवले म्हणाले. जर राज्यातील सरकार पडले तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times