वाचा:
‘गेले वर्षभर संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
वाचा:
करोना संसर्गामुळे एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यात मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करत आहोत. , यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला जात आहे. अशावेळी पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला, पण करोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सतर्क राहण्याच्याच सूचना केल्या आहेत.
वाचा:
म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यानी पुढे नमूद केले आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतिमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु, त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा अतिशय जिद्दीने सामना करीत असलेल्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवकांनाही मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times