मुंबई: दलित तरुण खून प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी केली आहे. ( )

वाचा:

सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे २ नोव्हेंबर रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आकाश जाधव याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल्या आकाशचा नंतर ४ डिसेंबर रोजी कुपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला जातीयवाद्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कारवाईसाठी वांद्रे, खार, सांताक्रूझ, पार्ले भागातील नागरिकांनी वाकोला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चाही काढला होता. याप्रकरणी आता रामदास आठवले यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

वाचा:

आकाश जाधवच्या खूनातील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करावी व आकाशच्या पीडित कुटुंबीयांना अनुसूचीत जाती- जमाती प्रतिबंधक (सुधारित) कायदा २०१५ नुसार तात्काळ आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी आणि पीडितांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे लेखी पत्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांना लिहिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे जातीअंत संघर्ष समितीचे नेते कॉ. शैलेन्द्र कांबळे व कॉ. यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या मुंबईतील संविधान बंगल्यावर भेट घेतली. यावेळी आपण सांताक्रूझ येथे पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, रामदास आठवले आज किंवा उद्या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here