करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण राज्यात तयारी सुरु आहे. राज्यात आज लसीकरणाची ड्राय रन पार पाडली. यासाठी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे होते. यानंतर संपूर्ण राज्यात लसीकरणाची मोहिम आखण्यात मदत होणार आहेय नागरिकांचं लसीकरण कसं केलं जाणार याचा घेतलेला आढावा

करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरासाठी (इमर्जन्सी यूज) लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार टप्प्यांत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) देशभरात राबविण्यात येत आहे.

मिशन वॅक्सीन! राज्यात करोना लसीकरण कसं होणार?

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण राज्यात तयारी सुरु आहे. राज्यात आज लसीकरणाची ड्राय रन पार पाडली. यासाठी पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे होते. यानंतर संपूर्ण राज्यात लसीकरणाची मोहिम आखण्यात मदत होणार आहेय नागरिकांचं लसीकरण कसं केलं जाणार याचा घेतलेला आढावा

ड्राय रन म्हणजे काय?
ड्राय रन म्हणजे काय?

आज राज्यातील काही आरोग्य केंद्रात ही लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली गेली. तसंच, प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रे ‘व्हॅक्सिनेशन साइट’ म्हणून निवडण्यात आली असून, लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सत्र कसे राबविले जाईल, याचे ‘मॉक ड्रील’ केले गेले.

पाच सदस्यांचे पथक
पाच सदस्यांचे पथक

लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर बुथ उभारण्यात आले आहेत या ठिकाणी सुरक्षारक्षक, व्हेरिफायर (पडताळणी करणारा), व्हॅक्सिनेटर (निरीक्षक), ऑब्झर्व्हर (निरक्षण) आणि मोबिलायजर (संघटक) असे पाच कर्मचारी उपस्थित राहणार आहे. तसंच, केंद्रावर सोशल डिस्टनसिंगचे नियम बंधनकारक असणार आहेत.

असे होणार लसीकरण
असे होणार लसीकरण

लसीकरणासाठी ‘एनरॉल’ केलेला कर्मचारी केंद्रावर आल्यानंतर यादीत त्याचे नाव आहे का, हे तपासले जाणार

नावाची खात्री पटल्यावरच त्याला आतमध्ये सोडले जाणार

लाभार्थ्यांची को-विन पोर्टलवरील माहिती, त्याचे नाव आणि ओळखपत्र तपासणार

संबंधित व्यक्तीचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करोना लसीकरण होणार

लसीकरणाचा परिणाम संबंधित व्यक्तीवर होतोय का ही शक्यता पडताळण्यासाठी निरीक्षण कक्षात पाठवणार

लसीकरणानंतर कोणतीही रिअॅक्शन आली नाही, याची खात्री झाल्यावर संबंधित व्यक्तीला केंद्राबाहेर जाण्याची परवानगी मिळणार

मास्क बंधनकारक
मास्क बंधनकारक

करोनाची लस आल्यानंतर मास्क आणि सोशल डिस्टनसिंगच्या फेऱ्यातुन आपली सुटका होईल, असा दिलासा अनेक नागरिकांना वाटत आहे. मात्र लस घेतली म्हणजे करोनामुक्त झालो अशा गाफिलपणा बाळगू नका, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसंच, लसीकरणानंतरही सोशल डिस्टनसिंग आणि मास्क बंधनकारक असणार आहे. लसीचे परिणाम जाणवायला दोन ते चार महिने लागू शकतात, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here