वाचा:
थर्टी फर्स्ट आणि नववर्ष यामुळे कोकणातील समुद्रकिनारे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांनी फुलले आहेत. ठाण्यातील (३६) आणि (३३) हे दाम्पत्यही नातेवाईकांसह पर्यटनासाठी येथे आलं होतं. आज समुद्रकिनारी भटकंती करत असताना या दोघांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही आणि हा सेल्फीच त्यांच्यासाठी काळ ठरला. हेदवीचा किनारा खडकाळ आहे. याच भागात सेल्फी काढत असताना सुचेना यांचा तोल गेला. त्यांना वाचवण्यासाठी अनंत यांनी प्रयत्न केला आणि दोघेही खोल घळीत कोसळले. त्यानंतर स्थानिक यंत्रणांना लगेचच कळवण्यात आले. मात्र, हे दोघे वाचू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील, स्थानिक तरुण तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले व पुढील कार्यवाही करण्यात आली.
वाचा:
दरम्यान, समुद्रकिनारी वसलेल्या हेदवी येथे खडकांतून उसळणाऱ्या लाटा अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात. थर्टी फर्स्ट व नवीन वर्ष यामुळे गेले काही दिवस येथे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यात आज घडलेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किनाऱ्यांवर अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरजही या निमित्ताने निर्माण झाली आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पेठ वडगाव येथून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या धनाजी तेवरे या तरुणाच्या मोटरसायकलला अपघात होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला. धनाजी हा आपल्या मित्रांसह दोन स्वतंत्र मोटरसायकलवरून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी पेठ वडगाव येथून निघाला होता. शुक्रवारी रात्री निवळी गणपतीपुळे मार्गावरून निघाले असताना धनाजी याच्या मोटरसायकलला अपघात झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. धनाजी मागे दिसत नसल्याचे पाहून मित्र मागे फिरले असता धनाजीचा अपघात झाल्याचे लक्षात आले.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times