वाचा:
पाळधी (ता. धरणगाव) गावातील आरती भोसले व प्रशांत पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघेही काही दिवस बेपत्ता झाले होते. ते थेट विवाह करूनच घरी परतले होते. दोघांच्या पालकांनी पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देऊन वाद मिटवला होता. त्यानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच आरतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. मात्र, विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. घटनेच्या दिवशी पती प्रशांत पाटील यानेही विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. त्याला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा मृत्यू झाला आहे.
वाचा:
आरती आणि प्रशांत यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जावून विवाह केला होता. यावेळी दोघांनीही देवाला साक्षी ठेऊन सोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली होती. विवाहानंतर अवघ्या तीन-चार दिवसानंतर आरतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या चोवीस तासातच प्रशांत याची देखील प्राणज्योत मालवली. आरतीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे दिसते. आता तिचा पती प्रशांत याचाही विषबाधेने मृत्यू झाला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह पण केला. मग दोघांनी विष का घेतले असावे? हा प्रश्न आहे. पोलिसांसमोर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times