‘हिवरेबाजार गावच्या २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणूकी करीता गावच्या विकासासाठी स्वतंत्रपणे परिवर्तन ग्रामविकास पॅनलची निर्मीती करुन सदर पॅनल अंतर्गत आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे. ‘आम्ही स्वतंत्र पॅनल उभा केला म्हणून आम्हाला फारमोठया प्रमाणात राजकीय विरोध सुरु झाला आहे. त्यातुनच आम्हास धमकावले जात आहे. तसेच आमच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. तसेच गावामध्ये निवडणूकीच्या दरम्यान राजकीय वाद उपस्थित करुन वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.
‘आमच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक सनदशीर मार्गाने पार पडण्यासाठी व आमच्या जीवाला राजकीय विरोधक यांच्याकडून धोका निर्माण झाला असल्याने सदर निवडणूकीच्या कार्यक्रमामध्ये व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक व गरजेचे आहे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘आम्ही स्वतंत्रपणे पॅनल उभा करुन ग्रामपंचायत निवडणूक लढवत असल्याने त्याबाबत गावातील राजकीय विरोध यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे, व तशा पद्धतीने गावामध्ये चर्चा घडवून आणली जात आहे. त्यामुळे ते कधी काय कृती करतील याचा नेम नाही. तरी आमच्या अर्जाचा गांभीर्याने विचार करुन आम्हास सदर ग्रामपंचायत निवडणूक २०२१ चे निवडणूक कालावधीसाठी व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच यांची निवड होईपर्यंत आम्हास पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times