२०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आणि शिवसेनेत आत्तापासूनच चढाओढ लागल्याचे दिसतेय. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आमदार यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. तसंच, भाजपा सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार आहे. एकीकडे शिवसेनेनंही भाजपला मात देण्यासाठी मोहिम आखली आहे.
मुंबई मा जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावरुनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद. शिवसेनेनं साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, जनाबसेनेला आपटा’, असं म्हणत शिवसेनेच्या या मोहिमेवर अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. तसंच. नेमकं काय? मराठी अस्मिता, अजान स्पर्धा की फाफडा?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times