हे नागरिक ‘लाँग टर्म हिसा’वर पुण्यात रहात होते. त्यांनी भारतीय नागरिकत्त्व मिळण्यासाठी अर्ज केले होते. याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. नागरिकत्त्व देण्यापूर्वी संबंधित नागरिकांना सात वर्षे भारतात राहावे लागते; तसेच नागरिकत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी १२ महिने मूळ देशाशी संपर्क ठेवावा लागत नाही. या नागरिकांची माहिती गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून घेण्यात येते. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर भारतीय नागरिकत्त्व देण्यात येत असते. त्यानुसार १३ पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. नागरिकत्त्व मिळालेल्या या १४ जाणांना आता प्रत्येकवेळी पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्वच देण्यापूर्वी त्यांना भारतीय राज्यघटनेचे पालन करण्याबाबतची शपथ देण्यात येते. त्यानुसार चार पाकिस्तानी नागरिकांना शपथ देण्यात आली आहे. या नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत १३६ जणांना
जिल्हाधिकारी यांच्याकडून परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३६ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात येतात. आणखी काही परदेशी नागरिकांनी भारतीय नागरिकत्त्व मिळण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times