शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे, असे बोर्ड मंदिर प्रवेशद्वारावर लावले होते. अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे, असे सांगत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी विरोध केला होता. तसेच साई संस्थांनला हा बोर्ड काढून टाकावा, म्हणून पत्र पाठवले होते. परंतु संस्थानाच्या वतीने हा बोर्ड काढण्यात आला नव्हता. या स्वतः हा बोर्ड काढण्यासाठी शिर्डी येथे डिसेंबर महिन्यात येत होत्या. मात्र त्यांना नगर जिल्ह्यात प्रवेश करतात सुपा येथे अडविण्यात आले होते.
त्यावेळी ३१ डिसेंबर पर्यंत संस्थांनी बोर्ड काढावा ,अन्यथा आह्मी पुन्हा येउन तो बोर्ड काढू, असा इशारा देसाई यांनी दिला होता. मात्र संस्थानने ड्रेस कोड बाबत लावलेला बोर्ड काढला नाही. अखेर आज, गुरुवारी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान शिर्डीत जाऊन या बोर्डवर काळा रंग फेकला आहे. यावेळी त्यांनी संघटनेच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times