नवी दिल्ली: भारताने बालाकोटमध्ये ( ) दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० जण ठार झाल्याचं पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने उघड केलं आहे. पुलवामा दहशतावी हल्ल्यानंतर काही दिवसांनी भारताने ही कारवाई केली होती. कायम पाकिस्तानी सैन्याचं गुणगाण गाणारे पाकच्या या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने हे मान्य केलं आहे. बालाकोट हवाई हल्ल्यात एकही व्यक्ती ठार झाला नाही, असा दावा पाकिस्तानने करत आला आहे. या दाव्याला छेद देणारं वक्तव्य माजी अधिकाऱ्याने केलं आहे.

पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका न्यूज टीव्ही शोमधील चर्चेत ही कबुली दिली आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ला बालाकोट हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी ठार झाले होते. हिलाली हे कायम टीव्ही शोच्या चर्चेत भाग घेत असतात आणि ते या चर्चेत पाकिस्तानी सैन्याची बाजू मांडताना दिसतात. भारतीय वायुसेनेने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या छुप्या ठिकाणावर हवाई हल्ला केल्यावर पाकिस्तानने त्यात कुणीही ठार झालं नसल्याचा दावा केला होता.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने हा हवाई हल्ला केला होता. सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान ठार झाले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पाकिस्तानमधील दहशतावादी संघटनेच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता.

भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत कारवाई केली. ज्यात किमान ३०० जण ठार झाल्याचं वृत्त होतं. पण आमचं लक्ष्य त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य करतो. तेच आमचं योग्य लक्ष्य आहेत. कारण ते सैन्यातील जवान आहेत. सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणाचाही मृत्यू झाला असं आपण भारताला सांगतिलं होतं. पण आता भारताच्या कुठल्याही कारवाईला जशास तसं प्रत्युत्तर देणार, तणाव पुढे जाऊ देणार नाही, असं आगा हिलाली म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here