मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर, युवासेनेचे सचिव यांना सरकारने एक्स दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सरदेसाई यांच्या सुरक्षेवरुन भाजपनं सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील काही बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर, सरकारमधील काही मंत्र्यांच्या कुटुंबियांना व नेत्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. यामध्ये युवासेनेचे सचिव असेलेले वरुण सरदेसाई यांना सुद्धा एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या सुरक्षेबाबत विरोधीपक्षानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भाजप आमदार यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

‘सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्यांना जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्यांनी मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळं अनेक नोकरशाह त्यांच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळं त्यांना सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती,’ असं म्हणत नितेश राणेंनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

‘वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलेलं दिसतंय,’ अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here