वाचा:
लोणावळा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गुजराती समाजाशी जवळीक साधण्याच्या हेतूनं शिवसेनेनं काल जोगेश्वरी येथे गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ना फापडा, ‘ अशी या कार्यक्रमाची टॅगलाइन होती. पत्रकारांनी याबाबत फडणवीसांना विचारलं असता, ‘गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करतेय याचा आनंद आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्तही त्यांनी गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा. शेवटी तेही आपले नागरिक आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
‘एकीकडं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना कडाडून विरोध करतेय आणि दुसरीकडं गुजराती समाजाला जवळ घेऊ म्हणतेय. अशा कार्यक्रमांनी कोणी जवळ येत नाही. कृतीतून लोक जवळ येतात,’ असं ते म्हणाले. ‘निवडणुका आल्यामुळं ही सगळी नौटंकी सुरू आहे. गुजराती भाषिकांचं सोडाच, निवडणुकीसाठी शिवसेनेनं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे केलं गेलंय. ऊर्दू भाषेत शिवसेनेची कॅलेंडरही निघताहेत. निवडणुकीच्या निमित्तानं ही सगळी नौटंकी चाललेय. हे सगळं कशासाठी चाललंय हे लोकांनाही कळतं,’ असं ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times