ठाणे: भिवंडीतील परिसरात एका महिलेवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. (३८) असे या महिलेचे नाव असून तिच्या डोक्यात एक गोळी लागली असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाचा:
आज सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान गोळीबाराचा प्रकार घडला असून त्यावेळी ही महिला घरी एकटीच होती. मुलगा बाहेर गेला होता. सकाळी दोघे जण घरी आले. बाचाबाची झाल्यानंतर आरोपींनी महिलेवर गोळीबार केला. एकूण दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी महिलेला लागली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त पी. बी. ढोले यांनी दिली.
वाचा:
महिला बेशुद्ध असून गोळीबार केल्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल,असे पोलिसांचे म्हणणे आहे. जयश्री या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times