मुंबईः आज दिवसभरात ३ हजार २८२ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट आता ९४. ७७ टक्के इतका झाला आहे. ()

राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त रुग्णांचा आकडा अधिक आहे. तर, रिकव्हरी रेटही वाढलेला आहे. त्यामुळं करोनाच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला काही अंशी दिलासा मिळाला आहे. आज राज्यात ५० रुग्ण करोनामुळं दगावले आहेत. करोनामुळं प्राण गमावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५० हजार १५१ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २.५४% टक्के इतका आहे.

आज राज्यात २ हजार ९३६ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ७४ हजार ४८८ इतकी झाली आहे. याउलट आज राज्यात ३ हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १८ लाख ७१ हजार २७० रुग्णांना डिस्चार्ज मिळाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या ५१ हजार ८९२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,००,७३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७४,४८८ (१४.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,८७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here