पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय याचे मंगळवारी बाजारात आहे. त्याच्या दुकानामागेच व वर्माचे आहे. त्यामुळे वर्मा व अक्षयमध्ये नेहमी वाद व्हायचे. मंगळवारीही राजू व अक्षयमध्ये वाद झाला. राजू हा संतापला. त्याने गुड्डू, रितेश व निखिलच्या मदतीने अक्षय याला पकडले. अक्षय याच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात अक्षय खाली पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चौघेही पसार झाले. या घटनेने परिसरातील दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी अक्षय याचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांचा शोध सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times