काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी केंद्राच्या निर्णयाला तीव्र आक्षेप घेतला आहे. अदनान सामीचे वडील पाकिस्तानी हवाई दलात अधिकारी होते. त्यांनी भारताविरुद्ध गोळीबार केला होता. असं असताना त्यांच्या मुलाला गौरवण्यात येत आहे. भाजपची चमचेगिरी हा सध्या पुरस्कारांचा मापदंड झाल्याची टीकाही त्यांनी केली. सामीला गौरवताना कारगिल युद्धात पाकविरुद्ध लढणारे मोहम्मद सनाउल्लाह यांना मात्र एनआरसीच्या माध्यमातून घुसखोर घोषित करण्यात आलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
वाचा: वाचा:
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनीही सरकारवर टीका केली. ‘सामी हा काही दिवसांपूर्वीपर्यंत पाकिस्तानी नागरिक होता. त्याला ‘पद्मश्री’ देऊन गौरवणं हा सामान्य भारतीयांना धक्काच आहे. केंद्र सरकारनं याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मनसेनंही या निर्णयाचा निषेध केला असून हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times