मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधी पक्ष असलेला भाजपा (BJP) आक्रमक झाला असून प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झालेले पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल त्यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा, असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांनी या मुद्द्यावरून मुंडे आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (bjp and maharashtra state president demand resignation of )

चंद्रकांत पाटील यांच्यापूर्वी किरीट सोमय्या आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.’

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराचा आरोप केले आहेत. भारतीय जनता पक्षाने रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे रेणू शर्मा या महिलेने तक्रार केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार- उमा खापरे
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी देखील मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागमी केली आहे. मुंडे यांच्याविरुद्ध ११ जानेवारी या दिवी रेणू अशोक शर्मा या महिलेने मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात खापरे लिहितात की, ‘सामाजिक न्याय हे खाते अतिमहत्त्वाचे खाते आहे. या खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. असे न केल्यास भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी, तसेच त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी.’

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here