म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील बड्या नेत्यांना भेटले की भेटणाऱ्याला त्या नेत्याच्या आशीर्वादाने कवचकुंडले मिळतात. मग कायदाही त्या व्यक्तीला काही करू शकत नाही, अशी टीका भाजपचे नेते यांनी अभिनेता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या भेटीसंदर्भात केली.

अभिनेता सोनू सूद यांनी बेकायदा हॉटेल सुरू केले असून त्यावर कारवाई करीत आहे. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदवर आरोप करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेताच ते आरोप गायब झाले. एकदा नेत्याला भेटले, की त्याच्या कृपेने कवचकुंडले तुम्हाला मिळाल्यानंतर कायदा आणि सरकारी यंत्रणा तुमचे काहीच करू शकत नाही. सोनू सूद हे शरद पवार यांना भेटले ठीक आहे. पण, शरद पवार यांना भेटून आपली बाजू मांडायची असते का, असा सवाल त्यांनी केला. आपल्यावरील कारवाईबाबत मुंबई महापालिकेकडे बाजू मांडली पाहिजे. जर प्रकरण न्यायालयात असेल, तर तेथे आपली भूमिका मांडली पाहिजे,’ असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सरकार चुकत असेल, तर…

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता योग्य पद्धतीने यावर चर्चा होईल. दोन्ही बाजू मांडल्या जातील. स‌र्वोच्च न्यायालयावर सगळ्यांचा विश्वास आहे. सरकार चुकत असेल, तर सर्वोच्च न्यायालय सरकारविरोधात निर्णय देईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here