भिवंडीतील काल्हेर भागात राहणाऱ्या जयश्री देडे यांच्यावर १२ जानेवारी रोजी सकाळी घरातच गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. दोघेजण घरात आल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आरोपींनी जयश्री यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी डोक्यात लागल्याने त्या गंभीर झाल्या असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. तपासामध्ये आरोपी मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक मध्यप्रदेशला रवाना झाले. धार शहरातून सुरेंद्र भाटी (२४) आणि मानसिंग चौहाण (२०) यांना ताब्यात घेत भिवंडीमध्ये आणले. चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मुख्य आरोपी सुरेंद्र भिवंडीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये काम करत असताना जयश्री यांचे पती शिवराम देडे यांच्याशी त्याची ओळख झाली. सुरेंद्रला पैशाची गरज होती. त्यामुळे मानसिंग सोबत संगनमत करत या महिलेला ब्लॅकमेल करत ५० हजार रुपये उकळण्यासाठी दोघेही महिलेच्या घरी गेले आणि पैशाची मागणी केली. महिलेने विरोध करत आरडाओरडा केल्यानंतर घराबाहेर असलेला तिचा मुलगा आणि अन्य एकजण यांनी घरी धाव घेतली असता सुरेंद्रने महिलेच्या डोक्यामध्ये गोळी झाडली. यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर मानसिंग याने महिलेसह इतरांना मारहाण करत दोघेही आरोपी पळून गेले, अशी माहिती चौकशीनंतर समोर आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सुरेंद्र याच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींवर आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times