मुंबई: राज्यात आता करोनाची (Coronavirus) घसरणीला लागल्याचे, तसेच ही साथ आता नियंत्रणात येत असल्याचे दररोज प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे स्पष्ट होत आहे. राज्यभरात गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार १४५ इतक्या नव्या करोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, गेल्या २४ तासांत एकूण ३ हजार ५०० रुग्ण बरे झाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे नवे रुग्ण वाढण्याच्या तुलनेत आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मृत्यूची संख्या पाहता राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. (maharashtra registered 3145 new covid 19 cases and 45 deaths)

राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ३३६ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच, आतापर्यंत एकूण १८ लाख, ८१ हजार, ८८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे एकूण ५२ हजार १५२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७८ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

अशी आहे पुण्यात करोनाची ताजी स्थिती!

शहराचा विचार केल्यास गेल्या २४ तासांमध्ये शहरात एकूण २६१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकूण तीन रुग्ण करोनामुळे मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत पुण्यातील एकूण १ लाख ८२ हजार ७०९ जणांना करोनाची लागण झाली आहे.

या बरोबरच गेल्या २४ तासांत २४० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत पुण्यातील एकूण १ लाख ७५ हजार ३९४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी –

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here