अहमदनगर: ‘आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक यांनी सरकारला पुन्हा एकदा सुनावलं आहे. उपोषणासाठी जागा दिली नाही, तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत उपोषण करण्याचा इशारा हजारे यांनी दिला आहे. त्याची माहिती देण्यासाठी सरकारला आणि जागेची परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रं पाठविली आहेत. त्यांचे उत्तर न मिळाल्यानं हजारे भडकले आहेत. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात काय, असा प्रश्न केला आहे. हाच मुद्दा घेऊन हजारे यांनी आज पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.

हजारे यांनी म्हटलं आहे, ’हे सरकार माझ्याशी सूडबुद्धीनं वागलं तरीही मी ठरविलं आहे की, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करायचंच. जिथं जागा मिळेल तिथं बसणार आहे. २०११ च्या आंदोलनाच्यावेळी तत्कालीन केंद्र सरकारनं जागा दिली नाही. म्हणून मी जेपी गार्डनमध्ये करायचं ठरवलं. तर सरकारनं मला सकाळी सहा वाजताच उचललं. दोनशे ते अडीचशे पोलिस पाठवून मला तिहार तुरुंगात नेऊन टाकलं. आंदोलनाला बसून दिलं नाही, सूड बुद्धीनं वागलं. मात्र, पुढं काय झाले? त्यावेळी मला तरुंगात टाकणं गरजचं होतं का? तरीही ते सूडबुद्धीनं वागले आणि शेवटी सरकार गेलं. म्हणून या सरकारनं यातून धडा घ्यावा.

क्लिक करा आणि वाचा-
हे खरे आहे की या सरकारचे देशभर वर्चस्व वाढलेलं आहे. त्यावेळच्या सरकारप्रमाणे होणे थोडंसं अवघड आहे. या सरकारलाही तेच वाटत असेल की आमचं कोण काय करू शकतं. मात्र, मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, एका फकीर माणसाचा अंत पाहू नये. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार आहोत,’ असंही हजारे यांनी ठामपणे सांगितलं.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here