वाचा:
काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी मनोज गुंदेचा यांची नियुक्ती केली आहे. शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या मान्यतेने ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून वाद पेटला आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, निखिल वारे, चिटणीस मुकुंद लखापती, रजनी ताठे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे, सुभाष रणदिवे, अज्जू शेख, अभिजित कांबळे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, बाळासाहेब पवार बैठकीला उपस्थित होते.
वाचा:
भुजबळ यांना हटविण्यामागे तांबे यांचे व्यक्तीद्वेषाचे राजकारण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सत्यजीत तांबे पूर्वी नगर शहर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून व्यक्तीद्वेषाचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या विरोधात निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा ते द्वेष करीत आहेत. त्यातूनच पक्षातील लोकांनाही याचा फटका बसत आहे. शिवसेनेशी जवळीक असलेल्यांनाही पदे मिळत आहेत. मात्र, पूर्वीपासून निष्ठेने काम केलेल्यांना दूर केले जात आहे. तांबे पित्रा-पुत्र स्वत: गटबाजी करीत असून त्याचा इतरांवर ठपका ठेवला जात आहे. ही गोष्ट निष्ठापूर्वक काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाही, त्यामुळे यासंबंधी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांची भेट घ्यायची. वेळ पडल्यास दिल्लीतील पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करायची, असे या बैठकीत ठरविण्यात आले. नव्याने करण्यात आलेले बदल आणि यामागील वृत्तीला विरोध कायम ठेवत शहरात पक्षासाठी काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times