मुंबई : मुख्यमंत्री यांनी लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. ( Latest Update )

वाचा:

‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा..! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात नमूद केले आहे.

वाचा:

शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढायचंय!

उपमुख्यमंत्री यांनीही सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. , कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केल्या. ‘वर्ष १९५६ मध्ये आजच्याच दिवशी बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील’, असे अजित पवार यांनी नमूद केले.

वाचा:

यांना रोखले
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर रोखले. त्यामुळे बराच गोंधळ झाला. गेल्यावर्षी मंत्री यड्रावकर हे एसटीने बेळगावला पोहोचले होते. यामुळे यंदा त्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावला पोहोचू द्यायचे नाही म्हणून कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल करण्यात आला होता. सकाळी प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करून पुढे सोडण्यात येत होते. कोगनोळी टोलनाक्यावर मंत्री यड्रावकर पोहोचताच त्यांना पोलिसांनी रोखण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. यड्रावकर आणि त्यांच्या समर्थकांनी यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मंत्री यड्रावकर यांनी निषेध केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here