वाचा:
राज्यातील १३ हजार २९५ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडले होते. या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत लागले असून सर्वाधिक ग्रामपंचायती आम्हीच जिंकल्याचा दावा सर्वप्रथम म्हणजे मतमोजणी सुरू असतानाच भाजपने केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी सहा हजार ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपचे असतील असे विधानही केलेले आहे. भाजपसोबतच शिवसेना आणि काँग्रेसनेही सर्वाधिक ठिकाणी आम्हीच विजयी झाल्याचा दावा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही नंबर वनचा दावा केला व तसे कागदोपत्री पुरावेही प्रदेशाध्यक्ष यांनी दाखवले.
वाचा:
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी माझ्याकडे प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आली आहे, असा दावा करतच राष्ट्रवादीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचे सांगितले. १३ हजार २९५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक ३ हजार २७६ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपला २ हजार ९४२ जागी विजय मिळाला आहे, शिवसेनेला २ हजार ४०६ तर काँग्रेसला १ हजार ९३८ ग्रामपंचायतींत विजय मिळाला आहे. यावरून राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादी पक्षाला ग्रामीण भागात असलेला जनाधारही यामुळे सिद्ध झाला आहे, असे पाटील म्हणाले.
वाचा:
उपलब्ध आकडेवारीनुसार मधील तिन्ही पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले असून तुलनेने भाजपचे अस्तित्व मर्यादित स्वरूपातच दिसून आले. भाजपला २० टक्केही यश मिळाले नाही, असेही पाटील म्हणाले. ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली जात नसल्याने भाजपने नंबर वनचा दावा करणं योग्य नाही, असेही पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times