म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पुण्यासाठी १८.५८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची मागणी पुणे महापालिकेकडून करण्यात आली असताना, पुण्याला नेमके किती पाणी मिळणार, याबाबतचा फैसला शुक्रवारी होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ( ) यांच्या उपस्थितीत होणार असून, त्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

कालवा सल्लागार समितीची बैठक दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येत असते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही बैठक होऊ शकली नव्हती. शुक्रवारी ही बैठक होणार असून, त्यामध्ये पुण्याला किती पाणी द्यायचे, याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी १८.५८ टीएमसी पाणी देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी वाढत्या लोकसंख्येबाबतची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे सादर केले असून, पुण्याची लोकसंख्या ही सुमारे ५३ लाख असल्याने या वर्षात पुण्यासाठी १८.५८ टीएमसी पाण्याची देण्याची भूमिका घेतली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here