शेतकऱ्यांच्या २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात गोळीबार करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता, असा दावा पकडण्यात आलेल्या शूटरने केला आहे. २३ ते २६ जानेवारी दरम्यान शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्यात येणार होत्या आणि नागरिकांना भडकवण्याचं काम महिलांकडे होतं. जाट आंदोलनावेळीही परिस्थिती चिघळवण्यासाठी काम केल्याची कबुली शूटरने दिली.
येत्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनात व्यासपीठावरील चार जणांना गोळ्या घालून ठार करण्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. यासाठी चार जणांचे फोटो देण्यात आले होते. या मागे राय पोलिस स्टेशनचा एसएचओ प्रदीप सिंह हे असून ते नेहमीच आपला चेहरा झाकून आमच्या बोलत असतात, असा दावा शूटरने केला. चार शेतकरी नेत्यांना ठार मारण्याचा कथित कट उघड करणाऱ्या त्या शूटरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times