कोलकाता: पश्चिम बंगालचे वनमंत्री ( ) यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जानेवारी २०२१ मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार सोडणारे ते तिसरे मंत्री आहेत. राजीनामा देण्याचं कारण राजीव यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितलं. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. ते ढसाढसा रडू लागले. आपल्याला कोणतीही औपचारिक सूचना खातं बदलण्यात आलं. यामुळेच कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत, असं राजीव यांनी सांगितलं. टीएमसीचे अनेक नेते नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राजीव यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजभवन येथे राज्यपाल धनखड यांची भेट घेतल्यानंतर राजीव बाहेर आले. सिंचन खातं बदलून वन खाते दिल्याची माहिती टीव्ही वाहिनीद्वारे आपल्याला कळली. खातं बदलल्याने आपल्याला कुठलीही समस्या नाही. पण ज्या पद्धतीने हे खाते बदल केले गेले त्यामुळे आपल्या खूप त्रास झाला. गेली अनेक वर्षे ममता बॅनर्जींनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचा आभारी आहे. यापुढे आपण बंगालच्या जनतेसाठी काम करत राहू, असं राजीव यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here