पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात इतर सहाजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. डहाणूतील धानीवरी येथे इको कारला हा झाला.
या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व अपघातग्रस्त लोक मुंबईहून गुजरातकडे लग्नासाठी जात होते. मात्र रस्त्यात भरधाव इको कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times