मुंबई: राज्यात आज ४५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, करोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधित रुग्णांचा आकडा आज पुन्हा एकदा वाढल्याने चिंतेत मात्र भर पडली आहे. ( )

वाचा:

राज्यात गेल्या दहा महिन्यांपासून करोना संसर्गाने थैमान घातले आहे. आता करोनावरील लस आल्याने व प्रत्यक्ष लसीकरणही सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात अजूनही करोनाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी काही हजार रुग्णांची भर दररोज पडताना दिसत आहे. त्याचवेळी करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा कधी कमी होतोय तर कधी वाढतोय, असे चित्र आहे. त्यामुळे अजूनही करोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

वाचा:

राज्याच्या आरोग्य विभागाने आजची करोनाची आकडेवारी जारी केली असून मृतांचा आकडा आज कमी झाल्याचे दिसत आहे. राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडलेल्या ५० हजार ७८५ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.५३% एवढा आहे. आज राज्यात २ हजार ७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख १२ हजार २६४ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४२ लाख ७ हजार ५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ९ हजार १०६ (१४.१४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८ हजार ९९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या करोनाचे ४४ हजार ८३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात सर्वाधिक १२ हजार २ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात ७ हजार ७४१ रुग्ण आणि पालिका हद्दीत ६ हजार ३२८रुग्ण सध्या उपचार घेतल आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here