मुंबईः ‘महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके महिने झालेत पण तेव्हा कोणतही आंदोलन झालं नाही. आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करताहेत,’ असा आरोप विरोधीपक्ष नेते यांनी केला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी आज मुंबईतील आझाद मैदानात एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही उपस्थिती लावली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

‘आता काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत. शेतकऱ्यांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आता जी लोकं या ठिकाणी मोर्चाच्या निमित्त मंचावर जात आहेत किंवा जी लोकं या मोर्चाला मदत करत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे. काँग्रेसनं आपल्या २०१९च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करा आणि आम्ही निवडून आलो तर बाजार समिती रद्द करु, असं का म्हटलं होतं, याचं उत्तर दिलं पाहिजे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘२००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला. २००६ पासून २०२० पर्यंत तो महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रातला कायदा चालतो आणि देशातला कायदा का चालत नाही? हा ढोंगीपणा का?,’ असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here