नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. आणि यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योक्ष श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना झाले आहेत.
यासोबतच कला क्षेत्रात एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर ), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्म विभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तसंच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये १० जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. या महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. सरकारने ७ जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात पार्श्वगायक एस. पी बालसब्रमण्यम यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे. तर १०२ जणांचा पद्म भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times