वाचा:
यांची आत्महत्या हा आनंदवनासाठी, आमटे कुटुंबासाठी आणि करजगी कुटुंबासाठी खूप मोठा आघात होता. या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात श्वास अडकल्याने शीतल यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. अजूनही या प्रकरणी तपास सुरू आहे. अशावेळी शीतल यांचे पती गौतम करजगी यांच्या फेसबुक पोस्टमुळे आनंदवनात नेमकं काय चाललंय?, असा प्रश्न पुन्हा एकदा उभा ठाकला आहे.
वाचा:
‘शीतल तू आयुष्यभर ज्यांची काळजी घेतलीस त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. याचीच सल माझ्या मनात आहे. तुझ्यापासून त्यांनी सुटका करून घेतली आहे. त्यात ते यशस्वी झाले आहेत पण आनंदवनाला तुझ्यापासून ते वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू मिळवली आहेस’, असे गौतम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले असून त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे?, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. ‘शीतल, तू माझ्या आयुष्यातील चमकता तारा आहेस आणि यापुढेही राहणार आहेस. मला तू आनंदवनाची ओळख करून दिलीस आणि खऱ्या अर्थाने ‘अर्थपूर्ण जीवन’ कसं जगायचं ते शिकवलंस’, असे नमूद करतानाच तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलचं संगोपन करेन आणि जीवन जगताना तू ज्या मूल्यांचं जतन केलंस ती मूल्ये त्याच्यातही उतरतील याची काळजी घेईन, असं वचन या पोस्टमधून गौतम यांनी दिलं आहे.
वाचा:
गौतम करजगी यांची भावनिक फेसबुक पोस्ट…
प्राणप्रिय शीतल (सोना), आज तुझा ४० वा वाढदिवस! तू खूप दूर निघून गेली असलीस तरी अजूनही तू माझ्या जवळच आहेस,तुला मिठीत घ्यावसं वाटतंय पण प्रिये…तुला अशाप्रकारे येथून शुभेच्छा द्याव्या लागतील याची मी कधीच कल्पना केली नव्हती.तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असं तुझं नेहमी सांगणं असायचं.शीतल, तू माझ्यासाठी चमकता तारा राहिली आहेस आणि कायमच राहणार आहेस. तू मला आनंदवनाची ओळख करून दिलीस आणि त्याचवेळी अर्थपूर्ण जीवनाचं मोल काय असतं याची शिकवणही तू मला दिलीस. तू एक उत्तम लेक, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. बाबा आणि ताई यांनी जपलेल्या मूल्यांची तू सच्ची अनुयायी होतीस. मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस.आज तुझ्या वाढदिवशी मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलचं संगोपन करेन. तू तुझ्या आयुष्यात जी मूल्ये जपली आणि जगलीस ती सारी मूल्ये शर्विलमध्ये उतरतील, याची काळजी मी घेईन. मला खात्री आहे की, तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील, ज्यांना आपल्या लेकीची काळजी आहे. जी माया आणि प्रेम आईवडिलांकडून त्यांच्या लेकीला मिळणं आवश्यक असतं ते तुला तिथे निश्चितच मिळेल.मी नेहमीच माझ्या चमकत्या तार्याची वाट पाहत राहीन- तुझाच गौतम
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times