कल्याणमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पत्रीपुलाच्या जवळच असलेल्या चौकाचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे करण्यात आले. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता. अगदी शेवटच्या क्षणी आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे शिंदे म्हणाले. आपण पश्चिम येथील एका कार्यक्रमाला जात होतो. मात्र येथे मला भाजप आमदार रवींद्र चव्हाण दिसले. त्यांना पाहूनही पुढे जाणे मला योग्य वाटले नाही आणि म्हणूनच मी थांबलो असे शिंदे यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
या वेळी शिंदे यांनी भाषणही दिले. शिंदे म्हणाले की, ‘मला बोलावले नसले तरी देखील मी आलो. आपण सोशल डिस्टन्सिंग कितीही पाळत असलो, तरी देखील एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times