फडणवीस यांनी काल दिल्ली मेट्रोतून प्रवास केल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली होती. ‘मेट्रोनं अगदी कमी वेळातच दिल्ली विमानतळावर पोहोचलो. कारशेडचा विषयाचा महाविकास आघाडीनं घातलेला गोंधळ बघता ‘मुंबई मेट्रो ३’ने विमानतळावर कधी पोहोचता येईल माहीत नाही,’ असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
वाचा:
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी फडणवीसांच्या या ट्वीटला सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या दिल्ली मेट्रोचं फडणवीसांनी कौतुक केल्याबद्दल सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबईतील सध्याची मेट्रो देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनंच केली आहे, याची आठवणही सावंत यांनी दिली आहे. ‘भाजपचे सरकार २०१९ पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन पाळू शकलं नाही. पण जे तुमच्या सरकारला जमलं नाही, ते महाआघाडीचं अनुभवी सरकार नक्की करेल. फक्त मोदी सरकारनं मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर करावेत,’ अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.
‘मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील भूखंड उपलब्ध होता. मात्र, शापूरजी पालनजी या बिल्डरशी सौदेबाजी करून भाजपनं सरकार त्यात घोळ घालून ठेवला. सार्वजनिक सेवेला प्राधान्य देण्याऐवजी तुमच्या सरकारनं खासगी बिल्डरांची तळी उचलली. त्यामुळं ‘मेट्रो ३’ चं खापर कोणावर फोडायचंच असेल तर आरशात बघा,’ असा सणसणीत टोलाही सावंत यांनी हाणला आहे.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील फडणवीसांना उत्तर दिलं आहे. ‘मुंबई मेट्रो ३ पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारकडून कुठलाही अडथळा येणार नाही यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करावेत,’ असं तपासे यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times