आग्रा: सासरच्या मंडळींनी पत्नीला पुन्हा न पाठवल्यामुळे पतीने भर चौकात स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेत पती ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सहावर परिसरातील काजी येथील रहिवासी येथील इंद्रसिंह यांच्या मुलीचा विवाह तीन वर्षापूर्वी सतेंद्र सिंहसोबत झाला होता. लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये सातत्याने वादविवाद होत होते. रविवारी, सतेंद्र आणि त्याच्या पत्नीत वाद झाला होता. त्यावेळी सतेंद्रच्या सासरच्या मंडळींनी सतेंद्रच्या पत्नीला पुन्हा माहेरी आणले. या घटनेमुळे वाद आणखी विकोपाला गेला. सोमवारी, सकाळीच सतेंद्र पत्नीला आणण्यासाठी सासरी दाखल झाला. मात्र, मुलीला योग्य वागणूक देत नसल्याच्या कारणास्तव सासरच्या मंडळींनी मुलीला पुन्हा तिच्या सासरी पाठवण्यास नकार दिला. पत्नीला सोबत न पाठवल्यास आपण आत्महत्या करू अशी धमकी सतेंद्रने सासरकडील मंडळींना दिली.

सतेंद्रने चौकात अंगावर पेट्रोल ओतून स्वत: ला पेटवून घेतले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भिती पसरली. अखेर काहींनी प्रसंगावधान राखत सतेंद्रच्या वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. जखमी सतेंद्रला उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची नाजूक प्रकृती पाहता त्याला अलिगड येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here