म.टा. प्रतिनिधी,

गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर तसेच विदर्भातील वातावरण कोरडे झाले होते. मात्र, आता परत एकदा ढगाळ वातावरण तयार झाले असून गुरुवारी रात्री शहरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शहरातील काही भागातील वीज पुर‌वठासुद्धा खंडित झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून थोडीफार थंडी जाणवू लागली होती. शहरात १६ ते १७ अंशांपर्यंत पोहोचलेला पारा अचानक ११ अंशांवर आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत तापमानात परत एकदा थोडीफार वाढ होऊन सोमवारी पारा १५.७ अंशांवर स्थिरावला. सध्या बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते आहे. त्यामुळे विदर्भातील वातावरणसुद्धा बदलले आहे.

गुरुवारी ढगांमुळे सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन व्हायलासुद्धा उशीर झाला. सकाळी व संध्याकाळी काहीसा बोचरा वारा जाणवला. शहरात अ‌नेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहील. त्यानंतर मात्र वातावरण कोरडे होईल. त्यामुळे तापमान अचानक ३ ते ४ अंशांची घसरण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी-
यंदा हिवाळा संपायची वेळ आली असूनही म्हणावी तशी थंडी जाणवत नाहीये. बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात सातत्याने वादळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे विदर्भातही ढगाळ वातावरण निर्माण होत राहिले.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here