सर्वासामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवासासाठी विशिष्ट वेळा ठरवण्यात आल्या आहेत. सकाळची पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत ते दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. प्रशासनानं ठरवून दिलेल्या या वेळांवर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे राम कदम यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
वाचाः
लोकल ट्रेन पाच महिने उशिरा सुरु करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय सरकारचा निष्काळजीपणा दाखवतो. मंदिरा अगोदर बार उघडण्याची घाई करणारे महाविकास आघाडी सरकार या गोष्टीचे उत्तर कधी देणार? सकाळी ७च्या अगोदर रात्री ९. ३० नंतर या ट्रेनचा फायदा कोणाला? का पुन्हा बारवाल्यांची चिंता?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
वाचाः
सरकारच्या निष्काळजीपणामुळं लाखो लोकांना नुकसान झालं, दूर राहणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, बदल्यांच्या पाठी मागे लागलेले हे सरकार, जनतेच्या प्रति गंभीरता कधी दाखवणार, अशा शब्दांत टीका केली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times