पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत त्या बोलत होत्या. देशातील जातीयवाद अजून संपलेला नाही. तसेच धर्माची सर्कसही अजून संपलेली नाही, असे म्हणत आजही जाती आणि धर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात असल्याचे अरुंधती रॉय म्हणाल्या. देशातील जनतेला एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवण्याचे काम केले जात आहे. या विरोधात सर्वांना एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही लढाई अस्तित्वाची आहे. आता आरएसएस विरुद्ध रेझिस्टन्स अशी ताकद उभी करावी लागेल, असे रॉय पुढे म्हणाल्या.
जात, धर्म आणि पुरुषत्व याबाबत सरकारच्या मनात खदखद आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी निर्णय घेतले जात आहेत. मुस्लिमांची कत्तल म्हणजे त्यांचाच गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असेही रॉय आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
ही भारतीय राज्यघटनेविरोधी काम करणारी परिषद नाही, असे सांगतानाच रॉय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. शहरांमधील रस्त्यांवर दलितांवर खुलेआम अत्याचार करणारे तसेच लोकांमध्ये नकारात्मकता पसरवणारे आपण नाही आहोत. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मणवादाचे नेतृत्व करत आहे. संसद त्यांच्याच हातात आहे. त्यांचे आवडीचे औषध गोमुत्र हे आहे, असे रॉय पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times