पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत कोळसे-पाटील बोलत होते. परिषदेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी यांनी देशासाठी बरेच काही केले असे सांगितले जाते. मात्र, त्यांनी काहीही केले नाही, असे सांगतानाच पठाणकोटमध्ये मुंगी देखील जाऊ शकत नसताना तेथे दहशतवादी कसे काय घुसले?, असा सवालही कोळसे पाटील यांनी केला. हा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना झेंडा फडकवणारा मोदींचाच माणूस होता, असा आरोप कोळसे पाटील यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा बातमी-
मनुवादाविरोधात लढाई सुरूच राहील- कोळसे पाटील
देशात अनेक मोदी येतील आणि जातील. परंतु मनुवादाविरोधात आमची लढाई ही अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच राहील, असा ठाम निर्धार कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेत केला. मनुवादी आणि मनीवादी (भांडवलदार) एकत्र आले असून ते जात, पंथ आणि धर्माच्या नावावर आपले शोषण करत आहेत, असा आरोपही कोळसे-पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times