नवी दिल्लीः शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत तणावाची स्थिती असताना इस्रायली दुतावासाजवळ स्फोट झाला. यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालचा दौरा रद्द करावा लागला. अशा परिस्थितीत उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींची ( ) यावेळची ‘मन की बात’ ( ) महत्त्वाची आहे. पंतप्रधान मोदी काय सांगणार?… वाचा अपडेट….

– करोनावरील स्वदेशी लसींमुळे आत्मविश्वास वाढला आहे. जगभरातून भारताचं मोठं कौतुक होतंय

– जगात सर्वात वेगाने भारताने १५ दिवसांत ३० लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली

– २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाच्या झालेल्या अपमानाने देश दुःख झाला

– पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दल नक्की जाणून घ्या, कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करता. सर्वांना त्यातून प्रेरणा मिळालेल

– नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी झाली. ऑस्ट्रेलिया भारतीय संघाने मिळवलेला विजय कौतुकास्पद

– मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन साजरा झाला. आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू झालं

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here