प्रीतीनं २०१८मध्ये इंडिया टूडे कॉन्क्लेवमध्ये पहिल्यांदाच तिच्या आयुष्यातील न विसरता येणाऱ्या अपघातांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिनं सांगितलं की, २००४ मध्ये एका त्सुनामीमध्ये तिनं तिच्या जवळच्या मित्र-मैत्रींणींना गमावलं. तिनं स्वतःच्या डोळ्यांसमोर आपल्या मित्र-मैत्रींणींना मरताना पाहिलं होतं. ‘मी त्यावेळी फुकेतमध्ये होते आणि तिथे आलेल्या त्सुनामीमध्ये मी मृत्यू खूप जवळून पाहिला आहे. त्या घटनेत मी माझा संपूर्ण मित्रपरिवार गमावला. आमच्या ग्रुपमधून त्या त्सुनामीतून वाचलेली मी एकटीच होते आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. या घटनेनंतर मी विचार केला की मी का वाचले? आणि त्यानंतर मी मला आयुष्यात जे-जे करण्याची इच्छा आहे ते करण्याचा निश्चय केला. अशाप्रकारे ती घटना माझ्या लाइफचा टर्निंग पॉइंट ठरली.’ असं प्रीतीनं सांगितलं.
२००४ च्या त्सुनामी आगोदर त्याच वर्षात प्रीतीसोबत आणखी एक दुर्घटना घडली होती ज्यातून ती मरता मरता वाचली होती. श्रीलंका येथे झालेल्या कोलंबो टेंपटेशन कॉन्सर्टमध्ये त्यावेळी प्रीती झिंटासह आणखी काही सेलिब्रेटींनी भाग घेतला होता आणि या ठिकाणी झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. पण या घटनेतूनही प्रीती मरता मरता वाचली होती.
प्रीतीच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं तर तिनं फेब्रुवारी २०१९मध्ये लॉन्गटर्म बॉयफ्रेंड जीन गुडएनफशी लग्न केलं. त्यांचा हा विवाहसोहळा लॉस एंजेलिसमध्ये अत्यंत खासगी स्वरुपात पार पडला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times